Skip to main content

शासनाने जाहिर केलेल्या डीसीपीआरच्या निर्णयाने बांधकाम क्षेत्राला उभारी: ना. भुजबळ

नाशिक| शेती व बांधकाम व्यवसायाने माणसाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे कोरोनाकाळात थांबलेला बांधकाम व्यवसाय सुरू करून अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या डीसीपीआरच्या निर्णयाने बांधकाम क्षेत्राला उभारी दिली असल्याचे मत, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 
DCPR-decision-announced-by-the-government-uplifts-the-construction-sector-mimister-Bhujbal
कोर्टयार्ड मॅरिएट येथे आयोजित क्रेडाई शिखर परिषदेत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीष मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारख, माजी सचिव महेश झगडे, सुनील कोतवाल, रवी महाजन, अनिल महाजन, डॉ. कैलास कमोद उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शासनाने स्टम्प डयुटीवर सूट दिल्यामुळे बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली. तसेच गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला डीसीपीआरचा प्रश्न शासनाने सूक्ष्म अभ्यास करुन सुटसुटीत पध्दतीने मांडला आहे. यात पार्किंग क्षेत्रासाठी असलेले क्लिष्ट नियम सोपे केले असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांना जास्तीचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकांनाही कमी दराने घरे उपलब्ध होणार आहेत. या नवीन डीसीपीआरमध्ये सायकल ट्रॅकचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने याचा फायदा जिल्ह्याच्या पर्यावरण पुरक व्यवसायाला होणार असल्याचे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. 
समाजसेवेत क्रेडाईचे योगदान मोलाचे असून, शासनाच्या मदतीला देखील त्यांचा हातभार आहे. कोरोनाच्या कठीण काळात क्रेडाईने  केलेले काम कौतुकास्पद आहे. क्रेडाईने भविष्यात नाशिकमध्ये अजून उत्तमोत्तम इमारती उभारव्यात असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...