Skip to main content

शालेय शुल्कवाढी विरोधात पालकांचे आंदोलन

मुंबई |शालेय विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्यावरून पालक संघटना आक्रमक झाल्या असून 'ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशन'च्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध पालक संघटनांनी काल शिवसेना भवनावर मोर्चा काढला.      
Parents-agitation-against-school-fee-hike-mumbai
लाॅकडाऊनमुळे अनेकांवर बेकारीचे संकट आले आहे. त्यामुळे शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी पालकांनी सरकारकडे केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी लाॅकडाऊनमध्ये शुल्लक घेऊ नये ,असे आदेश शाळांना दिले तरीही शाळा प्रशासनाकडून ‌‍विविध शुल्लक वसूल करण्यात येत होते. केवळ शिकवणी शुल्कच घेण्यात यावे या पालकांच्या विनंतीलाही शाळा प्रशासनाकडून  वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या. 
यासंदर्भात पालक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी ११.३० वाजता पालक वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानी पोहोचले, मात्र त्या तेथे रहात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालक संघटनांनी थेट शिवसेना भवनाकडे आपला मोर्चा वळवला.शिवसेना भवनावर स्टेट मायनाॅरिटी कमिशनचे अध्यक्ष जे.एम. अभ्यंकर यांनी याप्रकरणी एक बैठक बसवू असे आश्र्वासन पालक संघटनांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.            

ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशन चर्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मुंबई,पुणे,नाशिक,ठाणे ,नवी मुंबई अशा राज्यातील विविध पालक संघटनांचे प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते सामिल झाले होते.ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशनच्या अध्यक्षा अँड.अनुभा सहाय,राजश्री देशपांडे,मुनाफ मुल्ला,सुनिल चौधरी,केतन कुंभार ,प्रशांत अनूबंध,सुषमा गोराणे यांच्यासह बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांच्यासह बालमोहन पालक समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या मोर्चात सामील झाले होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...