Skip to main content

जलजीवन मिशन यशस्वीसाठी योग्य आराखडा तयार करा: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन योजना देशभरात राबवली जात आहे. सदरची योजना सन 2019 पासून सुरू झाली असून ती सन 2024 पर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहेत .हे पिण्याचे पाणी या योजने अंतर्गत  नागरिकांबरोबरच शाळा, अंगणवाडी, हॉस्पिटल यांच्यापर्यंत ही पोहचले जावे हाच या योजनेचा मूळ उद्देश आहे. 
Create-the-right-blueprint-for-the-success-of-the-jaljivan-mission-mp-dr-Bharti-Pawar
जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधिकारी कार्यालयात खा. डॉ भारती पवार,आमदार माणिकराव कोकाटे, आ. दिलीपकाका बनकर, आ. नितीन पवार, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नरवडे मॅडम, शेळकंदे, मोरे यांक्यासह इतर अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. जलजीवन मिशन आराखड्यातील कामे करत असतांना पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे  त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग आवश्यक असल्याचे खा. डॉ भारती पवार यांनी सांगितले.

यासाठी झेड. पी. पाणीपुरवठा विभाग व एम. जी. पी .यांनी योग्य समन्वय तयार करावा, ग्रामीण भागातील खास करून आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे. त्याठिकाणी वाहून जाणारे पाणी अडवूनच या पिण्याच्या पाण्याच्या योजना चांगल्या प्रकारे तयार करता येतील व त्या योजना जर यशस्वी करायच्या असतील तर त्यात काय काय बदल करणे अपेक्षित आहे, याचा ही अभ्यास होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी हे वाहून जाते ते त्या त्या ठिकाणी ते अडवून ते जिरवणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची भूजल पातळी  वाढण्यास  निश्चितच मदत  होईल.

दुष्काळी गावांना प्रथम प्राधान्यक्रम देऊन पावसाळ्यात वाहून जाणारे पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली गेली पाहिजे जेणे करून भूजल गर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळेल व त्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल. पंधराव्या वित्त आयोगात ही पन्नास टक्के रक्कम ही पिण्याच्या पाण्यासाठी तरतूद केली असून जलशक्ती मंत्र्यालयाद्वारे ही बजेट मध्ये तरतूद केली गेली आहे. ही योजना राबवितांना काही ऐन. जी. ओं.ना नाही बरोबर घेऊन काम करावे वेळोवेळी भूजल मूल्यांकन होणे आवश्यक असल्याचे ही खा डॉ भारती पवार यांनी सांगितले .या प्रसंगी जलजीवन मिशन व पाणीपुरवठा विभागाचा अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...