Skip to main content

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध संस्थांनी आर्थिक योगदानासाठी पुढे यावे: ना. भुजबळ

नाशिक| 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाच्यावतीने जवळपास दोन कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. परंतु संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधीन विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अन्न राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिक्कुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, साहित्य संमेलनाचे समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, संमेलनाचे मुख्य समन्वयक नितीन मुंडावरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, विश्वास ठाकूर, दिलीप खैरे, राजाराम पानगव्हाणे,यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
For-the-success-of-the-meeting-various-organizations-should-come-forward-for-financial-contribution-minister-Bhujbal
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले,  61 वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरात 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी  हि अभिमानस्पद बाब आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेबरोबरच याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे. त्यामुळे शहरातील विविध संस्थांनी व नागरिकांनी आर्थिक योगदानासाठी पुढे येवून लोकसहभाग वाढवावा. तसेच शहरातील हॉटेल चालकांनी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची, नास्ता व जेवणाची सोय करावी, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी बैठकित सांगितले.

संमेलनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना

साहित्य संमेलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सर्व मराठी साहित्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दुप्पट होणार आहे. तीन दिवसीय साहित्य संमेलेनास देशातून व राज्यातून अनेक साहित्यिक,लेखक ,कवी व रसिक मंडळी हजेरी लावणार आहेत. नाशिक शहराला साहित्य परंपरेबरोबरच परंतु जिल्ह्यांत आता अनेक धार्मिक पर्यटन स्थळही विकसित झाली आहेत.संमेलनासाठी येणारा प्रत्येक माणूस नाशिक मध्ये आल्यानंतर पर्यटन करुनच जाणार आहे. त्यामुळे उद्योगधंदा पर्यटन वाढणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री.छगन भुजबळ यांनी सांगितले.


बालसाहित्य’ मेळावा ठरणार संमेलनाचे आर्कषण

साहित्य समंलेनात सर्वच वयोगटातील लोकांचा  सहभाग असणार आहे. या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून 400 स्टॉल्स उभारले जाणार असून याव्यतिरिक्त  पर्यटन, चित्रकला, शिल्पकला, प्रकाशन कट्टा, कवीकट्टा यासाठी सुद्धा वेगवेगळ्या हॉल्सची उभारणी करणयात येणार आहे. कवीकट्टयात आपल्या कविता सादर करण्यसाठी आजपर्यंत 1 ‍हजार 532 कविता प्राप्त झाल्या आहेत. संमेलनात बालगोपाळांसाठी 3 दिवसीय बालसाहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित रहाणार आहे. त्यामुळे संमेलनातील ‘बालसाहित्य’ मेळावा संमेलनाचे आर्कषण ठरणार असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.


जगभरातील मराठी साहित्यिकांना संमेलनाची उत्सुकता: सूरज मांढरे

समाजमाध्यमांमुळे साहित्य संमेलनाची प्रसिध्दी सातासमुद्रापार जाणार आहे. विदेशातील साहित्यिकांनाही नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत कमालीची उत्सुकता आहे. यादृष्टीन संमेलन यशस्वीतेसाठी सहभाग घेवून आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्याला 151 वर्षपूर्ण झाली असल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकाला साजेसा कार्यक्रम होणे आवश्यक असून साहित्य संमेलनाने ती संधी मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.




Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...