नाशिक| शेतकऱ्यांचे शेतात रब्बी पिकांचे कामे सुरू आहे, अशातच वीज बिल भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल असा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे कोरोना काळाच्या संकटातून शेतकरी हळुहळू सावरत असताना हा प्रकार शेतकऱ्यांना अडचणीत भर टाकणारा आहे. शेतकऱ्याला आता खरी मदतीची गरज असून शेतकऱ्यांसह जनतेचा ही वीज पुरवठा तोडू नये अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली आहे.
शेतकऱ्यांचं सामान्य जनतेच्या गंभीर मुद्यावर खा. डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडले, कोरोनाचे संकट असेल किंवा निसर्गाचे संकट असेल शेतकरी मोठ्या धैर्याने हे संकट पेलत आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहे. खा. डॉ.भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे उदाहरण देत आज गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा इतर रब्बी पिकांची काढणी चालू आहे. याकरता वेळेवर शेतीला पाणी देणे गरजेचे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने एक शासन निर्णय (जी.आर.) असा काढला आहे की, जर विज बिल भरले नाही तर कनेक्शन कट करायचं.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज विजेची गरज आहे. त्यांना नोटीस दिली पाहिजे, सवलत दिली पाहिजे. परंतु चार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाहीत तर शंभर शेतकऱ्यांची भरलेले वीजबिले न बघता तात्काळ गावातीलच डीपीवरून दिले गेलेले कनेक्शन बंद करण्यात येत आहे. याचा खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेत निषेध करत केंद्र सरकारच्या माध्यमातून या गंभीर मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ लक्ष देवून आज सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित न करता तात्काळ सुरळीत करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात केली आहे.
