Skip to main content

निफाडच्या मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचके उतरल्या रस्त्यावर; कोरोना निर्बंध पाळण्याचे केले आवाहन

संतोष गिरी 
निफाड| तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज निफाड नगरपंचायतीतर्फे एक मोठी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मास्क न घालणारे त्याचप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन न करणारे अशा नागरिकांवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यात आली. एकूण 32 नागरिकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली. 
Niphad-chief-executive-officer-Dr-Shriya-Deochake-on-the-road-apeal-to-people-follow-corona-restrictions
तसेच एक किराणा मालाचे दुकान, एक चप्पल व बूट व्यवसायाचे दुकान या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करता मोठ्या प्रमाणात नागरिक छोट्या दुकानांमध्ये उभे असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरच्या कारवाईमध्ये निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह नगर अभियंता भालचंद्र क्षिरसागर, लेखापाल नितीन भवर, नगरपंचायतीचे कर्मचारी  काकुळते , कुंदे , धारराव,  भवर, राजू कापसे , राजू परदेसी, तुषार शिंदे त्याचप्रमाणे हर्षवर्धन मोहिते या सर्वांनी भाग घेतला होता. या सर्व कारवाईमध्ये दंड वसूल करणे हा या मागील हेतू नसून लोकांनी मास्क घालावे, नियम पाळावे, सामाजिक अंतराचे पालन करावे या गोष्टीची सक्ती करणं आणि त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालणं हा एकमेव उद्देश आहे. 
तरी निफाड नगरपंचायतीमधील सर्व नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये विनाकारण गर्दी करू नये. विनाकारण घराबाहेर बाहेर पडू नये. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्यास याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी असे मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी  निफाड शहरातील नागरिकांनासह सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांना  आव्हान केले  आहे. काम असेल तरच घराच्या बाहेर पडा "मी सुरक्षित, माझे कुटुंब सुरक्षित" हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन सर्वांनी काळजी घेतली तर या शहरात कोरोनाला  अटकाव घालता येईल असे सांगून,  कोरोनाला रोखण्यासाठी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाहेर पडल्याचे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया  देवचके  यांनी सांगितले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...