Skip to main content

व्यापक लसिकरणाने कोरोनावर नियंत्रण: आरोग्य विद्यापीठाच्या कार्यशाळेतील सूर

नाशिक| कोरोनाची झळ साऱ्या जगभर पसरली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व्यापक लसिकरणाची गरज आहे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 आजारा संदर्भात लसिकरणासाठी जनजागृती या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनकुमार तुपकरी, ओरिजिन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक श्री. संदीप कुलकणी व अधिकारी वर्ग ऑनलाईन उपस्थित होते.
Comprehensive-vaccination-controls-corona-health-University-workshop-tunes
याप्रसंगी डॉक्टर आणि समाजसेवा या विषयावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले की, समाजसेवा ही निरपेक्षपणे केली पाहिजे. कोविड-19 पेक्षाही अनेक भयंकर आजार कदाचित भविष्यात येतील, मात्र खंबीरपणे त्याचा सामना करावा. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे व हात वारंवार धुणे या गोष्टींकडे कायम लक्ष द्यावे. कोविड संदर्भात देण्यात येणारी लस प्रभावी असून ती प्रत्येकाने घ्यावी अशा पध्दतीने विद्यार्थ्यांनी समाजजागृती करावी आपले आरोग्य सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहिल. यासाठी वैयक्तीक स्वच्छता व सामाजिक भान जागृत ठेऊन जगावे. कोविड करीता कार्य करणारे डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती व समाजसेवकांचे कार्य महान आहे. सुदृढ आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने खंबीरपणे प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना सांगितले की, कोविड संदर्भात सुरु करण्यात आलेली लसिकरण मोहिम व्यापक स्वरुपात व्हावी. यासाठी समाजात सकारात्मक विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. कोविडला समाजातून हद्पार करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचे व सूचनांचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. कोविड संदर्भात आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, विद्यार्थी व समाजसेवकांचे काम उल्लेखनीय आहे. समाजाला कोविडपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने लसिकरण करणे गरजेचे आहे. लोकसहभागातून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे आणि समाजाला देखील सक्षम केले पाहिजे. कोविड-19 लसिकरण संदर्भात सर्वांनी सकारात्मक विचार करावा. आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी नियमित मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराबरोबर लसिकरण केल्यास आपण निरोगी राहू असे त्यांनी सांगितले. 
या कार्यशाळेत औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनकुमार तुपकरी यांनी वैद्यकीय विद्यार्थ्याचे आत्मभान या विषयावर बोलतांना सांगितले की, आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी सामाजिक आत्मभान जागृत ठेऊन काम करावे. कोविड-19 आजाराचा सामना करण्यासाठी समाजात सकारात्मक विचार पसरवावेत. याकरीता स्वयंसेवकांचा गट तयार करुन स्थानिक स्तरावर जनजागृतीचे कार्य करावे. लोकचळवळीतून लोकांना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याचे सोप्या भाषेेत माहिती द्यावी. कोविड प्रतिबंधासाठी लसिकरण ही अत्यंत महत्वपूर्ण मोहिम आहे. समाजात जागरुकता निर्माण करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ओरिजिन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने यांनी संकटकाळ - संयमाने भविष्याकडे विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, शरीर, मन आणि जीवनशक्ती या त्रिकुटावर जीवन चालत आहे. कोरोना काळात आपले शरीर सुदृढ असेल मन स्थिर आणि संयमी असेल तर आपण कोणत्याही रोगावर मात करु शकतो. कोविड आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी लसिकरण करणे गरजचे आहे. आपली सामाजिक जबाबदारी जागृत ठेऊन जीवन जगावे. निसर्गाने दिलेली शक्ती अपार असून मन मजबूत करा, सकस आहाराचे सेवन, प्राणायम, योगसाधना व सकारात्मक विचारांनी आपले आयुष्य नक्कीच वाढणार आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. संकटाच्या काळात न घाबरता शांत चित्ताने त्याचा प्रतिकार करण्याचा विचार करा, यश तुमचेच आहे असे त्यंानी सांगितले.

कार्यशाळेच समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.  यु-टयुब लिंकव्दारा प्रसारित कार्यशाळेस आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, अभ्यागत, अधिष्ठाता, प्राचार्य, महाविद्यालय प्रमुख, सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री. सचिन धेंडे, श्री. बाळासाहेब पेंढारकर,  श्री. विनायक ढोले यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...