Skip to main content

'केरळ'ची अविस्मरणीय सफर

प्रत्येकाच्या स्वप्नातलं मनातलं आणि भारतीय लोकांची देवभूमी म्हणजेच केरळ! आम्ही नाशिक ते एर्नाकुलम(कोची) मंगला एक्सप्रेस रेल्वेने निसर्गाच्या सुंदर सानिध्यात घेतलेली ही अविस्मरणीय सहल..
First-Kerala-Safar-Abhijit-Bhosale-sadhamm-tours-travals
एर्नाकुलम (कोची) येथे आम्ही सकाळी 10 वाजता पोहचलो व फ्रेश होऊन आम्ही कोची साईट सीनसाठी निघालो, आम्ही तेथे  चर्च, पैलेस बघितले. तसेच आम्ही मच्छी मार्केट, कथकली नृत्य शैली, संग्रहालय बघून आम्ही मॅरीने ड्राईव्ह या ठिकाणी गेलो.. तेथे अप्रतिम असे सुंदर दृश्य होते, केरळच्या फेमस असा लु-लु मॉलला जाऊन केरळी मसाले मोठ्या प्रमाणात खरेदी केले तसेच या ठिकाणी तेथील पारंपारिक कथकली नृत्य अनुभवले  आणि कोची येथे मुक्काम  केला.
प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच कोची ते मुन्नार. आम्ही 140 km असा ४-५ तासांचा  प्रवास केला... प्रवास करताना डोळ्याच्या नजरेत मावणार नाही असे रस्त्याने चहा, कॉफी, मसालेचे मळे बघण्यास मिळाले, मुन्नर हे हिल स्टेशन आहे, मुन्नर हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. परिसरात थंडी आणि दाट धुकं यामुळे माटुंप्पेट्टी धरण येथे बोट रायडिंगला फार मजा आली. तसेच इको पॉईंट बघण्यासारखा आहे, येथे 3 बाजुंनी डोंगर आहे तेथे आवाज दिल्यातर 4 बाजूनी फेकतो परत आपल्याला ऐकू येतो तसेच चहाचे संग्रहालय देखील बघण्यासारखे आहे. तसेच हत्ती जंगलात 5 किलोमीटर सफारी करण्यात आली, मुन्नर येथे रात्री शॉपिंग करण्याची मजाच काही वेगळी आहे, येथे चहा,कॉफी, चॉकलेट खूप फेमस आहे येथे आम्ही 2 दिवस मुक्काम केला.

आता आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच मुन्नर ते पेरियार (टेकडी) डोंगर भागातून 100 km असा प्रवास करत येथे पोहचलो, याठिकाणी नॅशनल जंगल पार्क खूप छान होते, या पार्कला जाण्यासाठी जीपने पाण्यातून प्रवास करावा लागतो येथे अनेक वन्य आणि जलचर प्राणी बघण्यास मिळाले, या जंगलात आदिवासी गाव खूप सुंदर बघण्यास मिळाले येते आम्ही 1 दिवस मुक्काम केला.

त्यानंतर पेरियार ते त्रिवेंद्रम 190 km प्रवास करत आम्ही केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे पोहचलो. कोवलम बीच येथे गेलो असेच येथे लाईट हाऊस आहे तेथून सूर्य मावळताना खूप सुंदर दृश्य दिसते.. तेथे आर्ट गॅलरी आहे तिथे अतिशय सुंदर बोलके खरे दिसणारे मेणाचे पुतळे तेथे पाहिले त्रिवेंद्रममध्ये सर्वात प्राचीन ऐतिहासिक ओळख असलेल श्री पद्मनाभस्वामी मंदिर येथे गेलो. या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि तेथील रहस्य हा एक चर्चेचा विषय आहे. परंतु सुंदर नक्षीकाम आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल, या मंदीराचे सौंदर्य रात्री खुलून दिसते, या मंदीरमध्ये स्त्री ने साडी परिधान करणे आणि पुरुषाने लुंगी घालणे बंधन कारक आहे. त्रिवेंद्रम जवळ बोट जंगल सफारी केली या बोटीतून प्रवास करताना डायनोसार पिक्चरची आठवण आली या बोटीतून प्रवास करताना दोन्ही बाजूनी व वरतुन झाडे झुडपे त्यामध्ये बोट प्रवास सुरू होता. तो प्रसंग अप्रतिम होता, त्रिवेंद्रममध्ये आम्ही 2 दिवस होतो.
 
आमच्या या देवभूमीतील एन्जॉय करण्याचा शेवटचा टप्पा म्हणजेच  त्रिवेंद्रम ते अल्लपी! 150 km प्रवास करत अल्लपी हाऊस बोट या ठिकाणी पोहचलो, आम्ही एक संपूर्ण दिवस या बोटमध्ये राहिलो. या बोटमध्ये राहण्याची जेवण्याची सर्व व्यवस्था हॉटेल सारखी असते, ही बोट नदी खाडीतून प्रवास करत असते, या बोटीच्या बाहेरचा नजरा खूप अविस्मरणीय असा आहे. नदी बाजूला सुंदर अशी घरे, नारळाची झाडे, आजू बाजूला बोट बघणास आलेले, आम्ही एक रात्र या हाऊस बोटवर राहिलो. केरळ टूर केली तर एक दिवस हाऊस बोटचा प्रवास पाहिजे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 50 km प्रवास करत कोची या ठिकाणी येऊन आम्ही परतीचा प्रवास केला. अशाप्रकारे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक असणाऱ्या केरळला आम्ही भेट देऊन आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभवांमध्ये वाढ केली.

           अभिजित श्यामराव भोसले, 
     संचालक,सद्धम्म टूर्स अँड ट्रॅव्हल्स 
      9762439524/8788429281

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...