Skip to main content

सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात धान्य वितरणासाठी दुकानदारांचे थम ठेवा: रेशन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक| देशात तसेच संपूर्ण राज्यात करोनाने थेमान घातले आहे. राज्यात ५२००० हजार व जिल्हातील २६०० रेशन दुकानदारांच्या दारापर्यंत कोरोना आला आहे. थममुळे कोरोना संक्रमणाचा धोका दुकानदारांना संभवतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोनावर नियंत्रण मिळेपर्यंत दुकानदारांचे थम घ्यावे अशी मागणी रेशन संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.  
Keep-the-shopkeepers-in-check-for-distribution-of-foodgrains-in-the-state-for-safety-Ration-Association-demands-CM

संपूर्ण शासकीय यंत्रणा करोनाशी दोन हात करण्यात गुंतली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. हॉस्पीटल फुल्ल झाले आहेत. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाही. तरी देखिल डॉक्टर, नर्स, पोलीस यंत्रणा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. आज राज्यात १०० च्यावर रेशन दुकानदार मृत्यूमुखी पडले. त्यांचे कुंटुब उघड्यावर पडले आहे. शासनाने मदत तर सोडा पण शासनाने साधी सहानभूती ही दाखवली नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दुकानदारांचे थम ठेवावे अशी मागणी रेशन संघटनेने केली.  

ही खेदाची बाब म्हणावी लागेले, इतरत्र गर्दी नको शासन म्हणत आहे. आणि रेशन दुकानात हजारो कार्डधारकांचा थम घ्या म्हणत आहे. केंद्र व राज्य सरकाला अस वाटत आहे. रेशन दुकानदाराला कोरोना होणार नाही. आज प्रत्येक गावात कोरोना पॉझिटीव संख्या वाढत आहे. बरेच कार्डधारक घाबरू गेले आहेत. त्याचा परिणाम वाटपावर होणार आहे. पॉझिटीव व्यक्तीचा थम कसा घेणार त्याच्या कुटुंबाचा तरी कसा घ्यावा. काही लोकांचा थम मॅच होत नाही, फार अडचणी आहे. दुकानदार ही शेवटी माणूस आहे. हा विचार शासनाने करावा अन्याथा पुढील मे महिन्यात कोणीही दुकानदार धान्या वाटपाच्या मनस्थितीत राहणार नाही. शासनाने याचा विचार करावा.

केंद्र सरकारने व राज्या सरकारने याचा विचार करुन करोना प्रार्दुभाव कमी होईपर्यंत थम शिथिल करावा अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे केली आहे, म्हणून शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी ही विनंती करण्यात आली आहे अन्यथा कोणीही वाटप करणार नाही, सरकारनं गाभीर्याने विचार अशी मागणी नाशिक जिल्हाध्यक्ष निवृती महाराज कापसे तथा राज्य उपाध्यक्ष,  विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील व इतर पदाधिकारी, सदस्यांनी केली आहे. 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...