Skip to main content

५० शिवसैनिकांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी: सुधाकर बडगुजर

नाशिक| कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांनी रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना प्रणित भारतिय विद्यार्थी सेनेच्या वतीने आवाहन केल्यानंतर 50 हून अधिक जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे,असे प्रतिपादन  शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
Social-commitment-committed-by-50-Shiv-Sainiks-by-donating-blood-Sudhakar-Badgujar
शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हे रक्तदान शिबिर पार पडले.यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून सर्वानी वर्षातून दोन किंवा तीनवेळा रक्तदान केले तर रक्ताचा देशात कुठेच तुटवडा जाणवणार नाही आणि रुग्णांनाहीं जीवदान मिळेल,असे खा.हेमंत गोडसे आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी सांगितले.
यावेळी महानगर संघटक योगेश बेलदार,विधानसभा संघटक विरेंद्र सिंग टिळे,गुड्डीताई रंगरेज, भारतीय विद्यार्थी सेना महानगर संघटक रवींद्र आव्हाड, श्रीकांत मगर, उपजिल्हासंघटक स्वप्नील जाधव,नीलेश पाटील,यशकुमार जानेराव,ओमकार कंगले,करण सूर्यवंशी, राहुल सानप,संजय गोसावी, तालुकासंघटक कुणाल ठाकरे, महानगर प्रसिद्धी संघटक भरत थेटे, अजय तिवारी,संदीप मते,भाग्येश निकम, रोहन दिवे, विजय कुमावत,आदित्य जोशी, उद्धव गांगुर्डे, महेश मते,सुरज दमकोंडे,प्रथमेश भांगरे,अक्षय बोराडे, उमेश धनगर,रोहित पवार,विशाल शिंदे, दुर्गेश भांगरे,समाधान मुंडे,संकेत देवळेकर, ओमकार कापडणीस, अभिजीत साबळे, दस्तगीर रंगरेज, सचिन धोगडे आदींसह भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...