Skip to main content

नार-पारचे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविण्यासाठी ध्यास घेणे आवश्यक: ना. छगन भुजबळ

नाशिक| महाराष्ट्राच्या भूमीवर पडणारा पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचा हक्क आहे. त्यामुळे आज आपण वापरात नाही म्हणून गुजरातला ह्या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्रात वळविण्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करण्याची तयारी दाखवली पाहिजे. मांजरपाडा-१ चे स्वप्न मी दहा वर्षापूर्वी बघितले होते. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष अथक प्रयत्न करावे लागले. या वर्षी पावसाळ्यात ह्या प्रकल्पाद्वारे दिंडोरी-चांदवड-येवला व त्यापुढील तालुक्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे नार-पार चे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे. हे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मांजरपाडा-१ ह्या प्रकल्पाकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून बघितले पाहिजे. अशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक ठिकाणी बोगदे करून समुद्राला वाया जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणणे शक्य आहे. मात्र हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक ध्यास घेऊन सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Care-must-be-taken-to-divert-Nar-Par-water-to-North-Maharashtra-Chhagan-Bhujbalto-divert-Nar-Par-water-to-North-Maharashtra-Chhagan Bhujbal
उत्तर महाराष्ट्र जलपरिषद मार्फत ऑनलाईन १४ ते १७ मे अशी चार दिवशीय वर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तिसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, जलतज्ञ इंजि.राजेंद्र जाधव, जलअभ्यासक सुरेश पाटील, भिला पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी विस्तृत विवेचन केले. 

यावेळी जलतज्ञ इंजि.राजेंद्र जाधव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, नर्मदा-तापी खोऱ्यात महाराष्ट्रावर गुजरातने अन्याय करून कमी पाणी दिले आहे. महाराष्ट्राची भोगोलिक परिस्थिती विचित्र आहे. सातपुडापर्वत रांगेच्या उत्तर बाजूने नर्मदा वाहत असल्याने ते पाणी आपण वापरू शकत नाही. तसेच तापी नदी महाराष्ट्रात खालच्या लेव्हलला वाहते. तर तिच्या उपनद्या गिरणा-पांझरा-बोरी-बुराई उंचावरून वाहतात. त्यामुळे तापीच्या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला करावयाचा झाल्यास ते पाणी उकाई धरणातून लिफ्ट करून गिरणा-पांझरा-बोरी-बुराई या नद्यांमध्ये टाकावे लागेल. सबब उकाई धरणातून ५० टीएमसी पाणी लिफ्ट करण्याची मागणी केंद्र सरकार व गुजरात सरकारकडे केली पाहिजे असे म्हणाले.

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता एकूण पावसाच्या ५०% पाऊस कोकणात पडतो व सर्व पाणी गुजरातकडे व समुद्राला वाहून जाते. त्यामुळे कोकणातील दमणगंगा-नार-पार-उल्हास-वैतरणा इत्यादी नदी खोऱ्यांचे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे आवश्यक आहे. या दृष्टीने ते स्वतः गेल्या बारा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राची आजची सिंचन क्षमता फक्त २३% असून देशात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील दीडशे तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. देशात सगळ्यात जास्त धरणे बांधून सुद्धा आपण महाराष्ट्राचा दुष्काळ दूर करू शकलेलो नाही. याउलट गुजरातने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने २८० टीएमसी चे उकाई धरण व ३३५ टीएमसी चे सरदार धरण बांधून पूर्ण केले. त्यामुळे गुजरातची सिंचन क्षमता ५५% झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, याव्यतिरिक्त दक्षिणेकडील दमणगंगा-नार-पार-पूर्णा-तापी-नर्मदेचे पाणी खंबाटच्या खाडीत नेऊन तिथे समुद्रात ३० किमी ची भिंत बांधून ३७० टीएमसी क्षमतेचे धरण बांधायचे, त्याच्या बाजूला चीन मधील शांघाय शहराच्या धरतीवर धोलेरा नावाचे जागतिक दर्जाचे शहर उभारायचे व संपूर्ण भारताचा व्यापार ह्या भागात केंद्रित करायचा असे गुजरात सरकारचे नियोजन झालेले आहे. हे महाराष्ट्रासाठी पथदर्शी व अनुकरणीय आहे. ह्याच प्रमाणे महाराष्ट्राने विकासाचा रोडमॅप तयार करणे आवश्यक आहे. “महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जलकराराद्वारे देण्यात येऊ नये यासाठी जलचिंतन संस्थेमार्फत चार वेळा उपोषणे केली, जनजागृती केली. सर्व लोकप्रतिनिधींना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मग मा.भुजबळ साहेबांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे मागच्या सरकारला गुजरात बरोबर करार करण्यापासून आम्ही रोखू शकलो. मात्र आता दमणगंगा-नार-पारचे पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात पोहचवण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. पाणी हे जीवन असून सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी, उद्योगासाठी जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन/समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी केंद्रसरकारने कमी व्याजदराने पैसा उभारला आहे, त्याच पद्धतीने नदीजोड साठी स्वतंत्र जलविकास महामंडळ तयार करून कमी व्याजदराने पैसे उभारून कमी दिवसात नदीजोड प्रकल्प उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दहा वर्षापासून छगन भुजबळ, दादा भुसे, खा.हेमंत गोडसे, विधानसभा अध्यक्ष झिरवळ साहेब, माजी आमदार जयंत जाधव व जलचिंतन संस्था यांच्या सामुहिक पाठपुराव्यामुळे पाच नदीजोड प्रकल्पांचे अहवाल तयार झालेले आहेत. त्यामध्ये नार-पार गिरणा लिंक-१२.५ टीएमसी, पार-कादवा लिंक- ३.५ टीएमसी, दमणगंगा-एकदरे लिंक-५ टीएमसी, गारगाई-वैतरणा-कळवा-देवलिंक-०७ टीएमसी, दमणगंगा-पिंजाळ लिंक-३१ टीएमसी, वैतरणा-गोदावरी लिंक-११ टीएमसी असे एकूण ७० टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी निधी आवश्यक असून त्यादृष्टीने सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रस्तावित केले. एन.एम.भामरे सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष बापू साहेब घाटकर यांनी कॅबीनेट दर्जाची जलतज्ञांची तांत्रिक समिती तयार करावी व त्याचे अध्यक्ष पद इंजि.राजेंद्र जाधव यांना द्यावे अशी सूचना केली. तसेच महाराष्ट्राचे हक्काचे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...