Skip to main content

देशात 'स्पुतनिक व्ही' लसीचे ऑगस्टपासून उत्पादन

मुंबई| कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे लसी हा एकच पर्याय उपलब्ध आहे. देशात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसी आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारताला आणखी एक शस्र मिळणार आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे देशात ऑगस्ट महिन्यापासून उत्पादन सुरु करणार आहे.
Sputnik-V-vaccine-production-in-the-country-since-August

भारतात स्पुतनिक व्ही लसीचे ८५ कोटी डोस सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत तयार केले जातील. जगातील ६५ ते ७० टक्के स्पुतनिक व्ही लस भारतात तयार होईल,असे रशियामधील भारतीय राजदूत डीबी व्यंकटेशन वर्मा यांनी सांगितले आहे. भारतातील स्पुतनिक लसीची गरज पुर्ण झाल्यानंतर रशिया इतर देशांमध्येही लस निर्यात करणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सिन नंतर भारतात आपत्कालीन वापरसाठी मान्यता मिळालेली स्पुतनिक ही तिसरी लस आहे. देशात कोरोनानंतर रुग्णांना भेडसावणाऱ्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या संदर्भातही भारत रशियाशी संपर्कात आहे. म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी रशियामधूनही औषधे मागवली जाऊ शकतात,असेही रशियामधील भारतीय राजदूत डीबी व्यंकटेशन वर्मा म्हणाले आहेत.

रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि रशियाचा सोव्हान वेल्थ फंड या लसीसाठी निधी पुरवत आहेत. लसीच्या उत्पादनासाठी त्यांनी भारतातीत पाच कंपन्यांशी करार केला आहे. भारतात आतापर्यंत स्पुतनिक लसीचे २ लाख १० हजार डोस मिळाले आहेत. मे महिन्याच्या अखेरीस ३० लाख लसीचे डोस आणि जून महिन्यात ५० लाख लसीं डोस मिळणार आहेत.

भारतात स्पुतनिक लसीचे उत्पादन तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. रशियाकडून पुरवठा आणि पूर्णपणे उत्पादन आधीच सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात RDIF मोठ्या प्रमाणात भारतात लस पाठवेल. त्या वापरासाठी तयार असतील. फक्त त्या विविध बाटल्यांमध्ये भराव्या लागतील. तिसऱ्या टप्प्यात रशिया संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करुन भारतीय कंपन्या संपूर्ण लसीचे उत्पादन भारतात करणार आहे.

बातमी/ फोटो: अजय माळी

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...