Skip to main content

राजर्षी शाहू महाराज आणि नाशिक

सन १९२० मध्ये उदोजी मराठा वस्तीगृह बांधण्यात येत होते.त्या वसतिगृहाचा कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून  म्हणून १५ एप्रिल १९२० मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले.त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते तो हा क्षण.
Rajarshi-Shahu-Maharaj-and-Nashik-Special-article-on-the-occasion-of-Chhatrapati-Shahu-Maharajs-birth-anniversary
महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे चालविला. त्यांचा नेतृत्वाखाली  अनके सत्यशोधक चळवळीत योगदान देणारे कार्यकर्ते जिल्ह्या-जिल्ह्यात तयार झाले. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधक समाजाच्या विचाराने तत्कालीन काळात अनेक तरुण भारावून गेले होते. यापैकी पिंपळगाव बसवंतचे कर्मवीर गणपत दादा मोरे हे सत्यशोधक जलसाकार म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली होती. जलसाच्या माध्यमातून सत्यशोधकी विचार त्यांनी समाजात पेरले तसेच, मराठा शिक्षण परिषद मधील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. नाशिकमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात,  कर्मवीर गणपत दादा मोरे आणि अन्य  सत्यशोधक कार्यकर्ते आणि मराठा पुढाऱ्यांच्या वतीने १९१४ पासून उदोजी मराठा बोर्डिंग सुरू करण्यात आली होती. 

या वसतिगृहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचे क्रांतिकारी पाऊल या कर्मवीरांनी टाकले होते. यासाठीच्या अनंत खस्ता ते घेत होत होते. विद्यार्थी जमा करणे, आर्थिक मदत निर्माण करणे. या वसतीगृहाला कोल्हापूर, बडोदा, धार, ग्व्हालेर संस्थानाचा राजाश्रय तसेच गावागावात ‘तेरावे बलुत’ गोळा करून ते आर्थिकभार सांभाळीत होते. गणपत दादा जलसा सादर करून वसतिगृहासाठी मदत मिळवीत होते.  सत्यशोधकीय जलसा च्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांचा “सर्वव्यापी जगत्पती त्याला नको मध्यस्थी” तसेच “शिक्षणाने येते मनुष्यत्व ,पशुत्व हटते पहा’ हा  विचार पेरण्याचे काम केले जात असे. याचा त्रास सत्यशोधक कार्यकर्त्यांना झाला. याला कर्मवीर गणपत दादा मोरे हे सुद्धा अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा मोठा त्रास झाला. पिंपळगाव बसवंत मधील असाच एक वाद पुढे आणून तत्कालीन परिस्थितीमध्ये गणपत दादा यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आले होती. 

सन 1920 मध्ये उदाजी मराठा वस्तीगृह स्वतःच्या जागेत जेव्हा बांधण्यात येत होते. त्याच्या कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून म्हणून 15 एप्रिल 1920 मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले. त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. अनेक समारंभ ठेवण्यात आले. परंतु त्यांच्या कानी सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा यांच्या कार्याची महती पोहचली होती. म्हणून त्यांना गणपत दादा मोरे यांचा पिंपळगाव ला येऊन सत्कार ,सन्मान करायचा होता म्हणून ते पिंपळगाव बसवंत ला येऊन कर्मवीर गणपत दादा मोरे आणि त्यांच्या पत्नी शारजाबाई मोरे हे बहुजन समाजासाठी घेत असलेल्या कष्टाचे कौतुक करून गणपत दादा मोरे यांची आपल्याबरोबर गाडीत बसून मिरवणूक काढली.त्यांना पाचशे रुपये बक्षीसही दिले. 

लेखक :लक्ष्मण घाटोळ-पाटील,
पत्रकार नाशिक

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...