Skip to main content

आईचे छत्र हरवलेल्या बालकांना शिवसेनेकडून मदतीचा हात

मोखाडा| तालुक्यातील साखरी येथील ललिता बाबू वाघ (४५) या कातकरी महिलेचं पाच महिन्याचे बाळ असताना तिचा मृत्यू झाला, यानंतर गेल्या एका वर्षाभरापासून तिची मुलगी कल्पना सुनिल सवरा  ही त्या बाळाचा सांभाळ करत होती परंतु दुर्दैवाने प्रसूती दरम्यान तिचा देखील महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला व सुदैवाने तिचे बाळ वाचले. परंतु  या दोन्ही बालकांना नियतीच्या खेळाने त्यांच्या आईपासून दुर केल्याने त्यांच  पालनपोषण करणं अवघड झालंय. त्याच्यासाठी शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला.
ShivSena-lends-a-helping-hand-to-children-who-have-lost-their-mother
गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा मामा मंगेश बाबू वाघ हा कार्तिक (सहा महिने) गुरुनाथ (दीड वर्ष) यांचा सांभाळ करत होता.परंतु त्याला देखील सात महिन्याची मुलगी आहे, त्यातच त्यांची परिस्थिती देखील हलाखीची असल्याने त्याला देखील अधिक दिवस या मुलांचे सांभाळ करणे शक्य होत नव्हते, यामुळे गेल्या काही दिवस कार्तिकचे वडील या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होते.या नंतर सुनिल सवरा याचा भाऊ कार्तिक सवरा हा गेल्या आठवड्या भरापासून या मुलांचा सांभाळ करतोय. 

परंतु या सर्वांचीच परिस्थिती हलाखीची असल्याने या लहानग्याचा पालन पोषण कसं करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर येऊन ठाकला असताना मोखाडा शिवसेनेने सामजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. पालघर  जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या कुटूंबियांना दोन महिन्याचे किराणा साहित्य देण्यात आले. तसेच तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी रोख स्वरूपात मदत केली तसेच या चिमुकल्यांचा भविष्यात कोणतेही मदत लागल्यास शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील असे प्रकाश निकम यांनी सांगितले. यावेळी मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम,स्थानिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थिती होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...