Skip to main content

उद्योगांसाठी भूखंडावर ४० टक्के बांधकामाची अट २० टक्के करू: उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई

मुंबई| महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणीसंदर्भात  उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमालवली नुसार भूखंडावरील ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
We-will-make-the-condition-of-40-percent-construction-on-land-for-industries-20-percent-Industry-Minister-Subhash-Desai
 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांची भेट घेतली.याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांचे अभिनंदन करून करोनाकाळात राबविण्यात आलेल्या योजनांचे स्वागत केले. उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध बाबींकरिता पूर्तता कराव्या लागतात. उदा. चटई  निर्देशांक, इमारत पृणत्वाचा दाखला , ट्रान्सफर मुदतवाढ व अनुदान बाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. 

तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिकला महिला क्लस्टरसाठी भूखंड मिळविण्याकरीता बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत आहे. उद्योग मंत्रालयाने महिला उद्योग धोरणानुसार नाशिकच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरीता महिला क्लस्टरसाठी भूखंड द्यावा अशी मागणी केली. उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी उद्योग मंत्रालयाने सुरु केलेल्या प्रोत्साहन योजनाची (अमेन्सटी स्किम) माहिती उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र चेंबरमार्फत राज्यातील उद्योजकांपर्यंत पोहचवावी व उद्योगांना फायदा मिळवून द्यावा असे सांगितले.  

शिष्टमंडळात आमदार श्री. चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, कागल हातकणंगले फायुस्टार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे गोरख माळी, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन दलवाई प्रभारी सरकार्यवाह श्री. सागर नागरे उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...