Skip to main content

चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत: प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत

नाशिक| देशाच्या अर्थव्यवस्थेत चालक हा अतिशय महत्वाचा घटक असून दररोज आवश्यक त्या गरजू वस्तूंची उपलब्धता करून देण्यात त्यांचा मौलाचा वाटा आहे. वाहतूक क्षेत्रात काम करत असतांना चालकाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे चालकांनी आपण करत असलेल्या कामाबाबत न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. चालक करत असलेले काम हे अतिशय महत्वपूर्ण असून चालकांनी तणावमुक्त राहून वाहने चालवावीत असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव भगत यांनी केले.
Corona-vaccination-of-300-drivers-per-day-from-Nashik-District-Transport-Association
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक यांच्या वतीने चालक दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी नारायण लॉन्स, कोणार्कनगर, नाशिक येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष पवार, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष विजय कालरा, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, सुभाष जांगडा, भारत टाकेकर, इंद्रपाल सिंग चड्डा, संजय सोनवणे, कल्पना शिंपी,महावीर मित्तल,सुनील बुरड,जे.पी.जाधव,रामभाऊ सुर्यवंशी, संजय राठी, महेंद्र सिंग राजपूत मनोज उदावंत,शंकर धनावडे, दिपक ढिकले,विनायक वाघ,दीपक ताकाटे, नाना पाटील, दलजीतसिंग मेहता, सूरज चिंचोले,माणिक मेमाणे, अवतार्सिग लोंगिया, दिपक पांडे,राजेश शर्मा,विजू खोळपे, सदाशिव पवार,कैलास शिंदे,गजानन सोसे,बजरंग शर्मा,किशन बेनिवाल, आमोल चव्हाण,सिद्धेश्वर साळुंके, इरफान सय्यद, विकास शेलार,नाना लभडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ३०० चालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तसेच यावेळी चालकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्याचबरोबर २५ वर्ष अपघात रहित सेवा बजावणाऱ्या चालकांचा व वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला चालकांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव भगत पुढे म्हणाले की,  केंद्र व राज्य शासन रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे आता अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत. मात्र यावर आपल्याला थांबता येणार नाही. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी चालकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यांनी वाहने चालवितांना योग्य ती काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त ठिकाणी नागरिकांनी देखील आपले कर्तव्य म्हणून अपघात ग्रस्ताचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे. त्यातून अनेक नागरिकांचे जीव आपण वाचवू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने भारत भरात पहिल्यांदाच चालकांचा सन्मान व्हावा यासाठी कार्यक्रम सुरु केले. या कार्यक्रमामध्ये मला नेहमीच सहभागी होता आले याचे मी भाग्य समजतो. आज चालक दिन आपण साजरा करत आहोत. खरतरं प्रत्येक व्यक्ती हा चालक आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या प्रकराची वाहने चालवीत असतात. त्यामुळे आज हा प्रत्येक चालकाचा दिवस असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात परदेशात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे देखील आता या क्षेत्रात महिलांचा सहभाग नक्कीच वाढेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड म्हणाले की, चालक दिनाचे औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी चालक व चालकांचे संपूर्ण कुटुंब कोरोनापासून मुक्त रहावे यासाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविली आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी व चालकांचा सन्मान देखील करण्यात आल्याचे सांगत ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असून यामध्ये चालकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, चालकांना वाहतूक करत असतांना दर १०० किलोमीटर अंतरावर विश्रांतीगृह निर्माण करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरात ट्रक टर्मिनलची व्यवस्था असावी जनेकरून याठिकाणी वाहनांची अधिक गर्दी होणार नाही. अपघात टाळले जातील आणि चालकांना देखील सुविधा उपलब्ध होतील. नाशिक तसेच सिन्नर येथील एमआयडीसीमध्ये राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभे करण्यात यावे यासाठी देखील नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी उद्योगांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन करत ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत आपण लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाष पवार यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात वाहतूक व्यवसाय पूरक कंपन्या टाटा मोटर्स, इंडूलूब ऑईल, श्रीराम फायनान्स आदी कंपन्यां सहभागी झालेल्या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन संजू राठी व सह.चेरमन महेंद्रसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...