Skip to main content

कोरोना योद्धा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे निळे प्रतीक संस्थेचे आवाहन

औरंगाबाद |प्रतिनिधी| निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबादच्या वतीने, स्मृतीशेष नामदेव सांडूजी साळवे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त, कोविड योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक १३ऑक्टोबर २०२१ रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,टी. व्ही सेंटर हडको औरंगाबाद येथे मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
Nile-pratik-organization-appeals-to-apply-for-the-Corona-Warrior-Award

कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात नागरिक रस्त्यावर येण्यासाठी देखील घाबरत असत.अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची,आणि आपल्या परिवाराची पर्वा न करता अनेकजण कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाची सेवा करत आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यात अनेक कोरोना योद्ध्याचा कोरोनाने बळी घेतला. याची निळे प्रतीकने गंभीर दखल घेतली आहे. लॉकडाऊन काळात देखील निळे प्रतीकच्या वतीने अनेक गरजूना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले होते.

 कोरोना काळात ज्यांनी आपलं योगदान दिलं, माणुसकी जपुन आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या कोविड योद्धा्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.कोविड रुग्णालयात ज्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे. त्यांनी रग्णालयात काम केल्याचा पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, एक पासपोर्ट फोटोसह संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून अर्ज करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रतकुमार साळवे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
आयु. रतनकुमार साळवे, 
अध्यक्ष निळे प्रतीक बहुद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद:- 9923502320

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...