Skip to main content

रक्तातील साखरेच्या पातळी संदर्भात रुग्णांनी काळजी घ्यावी: नगरसेविका सुषमा पगारे

नाशिकरोड| प्रतिनिधी| हृदयरोग आता तिशीच्या उंबरठ्यावर असतांना देखील होतो. हृदयरोगाला शरीरात साखरेची वाढलेली पातळी कारणीभूत असते. समतोल रक्तपातळी ठेवण्यासाठी योग्य आणि वेळच्यावेळी आहार, व्यायामाची नितांत आवश्यकता गरजेची असून वाढत्या वयात रुग्णांनी यासंदर्भात जास्त काळजी घ्यावी, असे प्रतिपादन प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी केले.
Patients-should-be-careful-about-blood-sugar-levels-Sushma-Pagare
उपनगर येथील युगांतर संपर्क कार्यालयात ईच्छामणी क्लिनिक आणि युगांतर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदयरोग दिनानिमित्त 'आरोग्य तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. शिबिरात रक्तातील साखरेची पातळी, रक्तातील चरबीचे प्रमाण, ३ महिन्यातील साखरेच्या पातळीची सरासरी, रक्तदाब यासंदर्भात सखोल तपासणी करून गरजू रुग्ण, वयोवृद्ध, तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ सौ रेश्मा घोडेराव, डॉ समीर लासुरे यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करून वाढत्या वयानुसार जीवनशैलीत बदल, नित्य व्यायामाची आवश्यकता, जेवणाच्या योग्य वेळा, व्यसनाचे दुष्परिणाम, हृदयरोग प्रतिबंध कसा करावा याची माहिती सादर केली. १३५ ते १५० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. 
याशिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तातील साखर पातळी तपासल्यानंतर ताबडतोब वाढलेल्या साखरेची नोंद केलेले पत्र देण्यात आले. आरएसएस-डीआय (डिफीट डायबेटीस) 'मधुमेह घालवा'  याशासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशभरात १ कोटी गरजू रुग्णांची विनामूल्य तपासणी केली जाणार असल्याचे लक्ष्य आहे. त्यानिमित्त जागतिक हृदयरोग दिनाचे औचित्य साधून उपनगर मध्ये सर्व स्तरातील रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे(सर) यांनी आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व कथन करून सर्व उपस्थित डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. चेतन पाटील, प्रशांत वाणी, शैलेश चांद, कुणाल पगारे, कीर्ती सुर्यवंशी यांनी शिबीर यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...