नाशिक| 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तमामा नागरिकांना निमंत्रण असून प्रवेश खुला आहे. त्यासाठी स्वतंत्र पास, तिकीट अथवा तत्सम बाबीची काेणती गरज असणार नाही. मात्र काेराेनाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, जसे लसीकरण झालेले असणे आणि मास्कचा वापर करणे इत्यादी याचे पालन सर्वांनी करुन सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरीयंटमुळे चिंता वाढली असून या नाशिकमध्ये होणार्या साहित्य संमेलनावरही त्याचे परिणाम पहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी बैठक घेतली असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी मास्क घालने आणि लसीकरण केल्याशिवाय प्रवेश नाही असा निर्णय घेतला आहे.
या संमेलनासाठी नाशिकच्या विविध ठिकाणाहून तीनही दिवस बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस सकाळी 8 वाजेपासून सुटणार असून त्या साधारण दर 15 मिनीटांनी उपलब्ध हाेतील. सविस्तर माहिती साेबत जाेडली आहे.
काही प्रतिनिधी संमेलन स्थळी येऊन ऐनवेळेस प्रतिनिधी शुल्क भरु शकतात.त्यांना असे शुल्क तेथे भरता येईल. बाहेर गावाहून काही प्रतिनिधींना निवासाची व भाेजनादी व्यवस्था नकाे आहे त्यांना असे प्रतिनिधी शुल्क भरावे लागणार नाही असे सांगण्यात आले आहे.