Skip to main content

गुणवत्ता आणि संशोधन वाढीसाठी मूल्यमापन गरजेचे: कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक| शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी महाविद्यालयांनी मूल्यमापनासाठी निर्देशित केलेल्या कार्यपध्दतीची अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल  डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. 
Evaluation-required-for-quality-and-research-growth-Hon-Vice-Chancellor-Dr-Madhuri-Kanitkar
वैद्यकीय विद्याशाखेकरीता विद्यापीठातर्फे ’सिम्पोसियम ऑन असेसमेंट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑन द बेसिक ऑफ नॅक पॅरामिटरर्स’ विषयावरील कार्यशाळेत अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वाय.एम. जयराज, लोणी येथील प्रवरा इन्स्टीटयुट ऑफ मेडिकल सायन्सेसचे समन्वयक, एम्स नागपूरचे मा. सदस्य डॉ. सिध्दार्थ दुभाषी, तुतीकोरीनचे व्हि.ओ. चिदंबरनार कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राजा डी. पेचुमिथू आदी मान्यवर ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंबी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी ’नॅक’ निर्देशित केलेल्या मापदंडाचा अवलंब करावा. महाविद्यालयांकरीता तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केल्यास मुलभूत प्रक्रिया व कार्यपध्दतीत महाविद्यालयांना अडचणी येणार नाहीत. गुणवत्ता व संशोधनवाढीसाठी पायाभूत बाबींचा पूर्तता होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये संशोधनावर भर देण्यात आला आहे. शिक्षण प्रणालीचा जागतिक स्तरावर विस्तार करणेसाठी महाविद्यालयांनी ठरवून दिलेले नियम व निर्देश यांचे काटेकोर पालन करावे जेणेकरुन मूल्यांकन प्रक्रिया सोपी होईल असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या प्रारंभी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कार्यशाळा महत्वपूर्ण असून अद्ययावत ज्ञानाचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. याकरीता सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठाने निर्देशित केलेल्या कार्यपध्दतीचा व नियमावीलचा वापर करावा. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तंत्रज्ञान व त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन प्रभावी ठरते. यासाठी वेळोवेळी कार्यशाळा, चर्चासत्रांत सहभाग घेऊन सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि कार्याचे योग्य मुल्यमापन करावे असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेतडॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वाय.एम. जयराज यांनी करिकुलम अस्पेक्ट व टीचींग लर्निंग अॅण्ड इव्हॅल्युएशन विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण गरजेचे आहे. याकरीता विविध ई-कोर्सेसचा अवलंब करावा. क्वालिटी मॅनेजमेंट करीता मार्गदर्शक तत्वांचा वापर, स्टॅडर्ड परफॉमन्स अॅण्ड लर्निंग आऊटकम, शैक्षणिक सबलीकरणाकरीता गुणवत्ता कार्याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. याकरीता आवश्यक घटक, संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्य व त्यावर परिणाम करणारे घटक आदींची माहिती त्यांनी दिली.

कार्यशाळेत एम्स नागपूरचे मा. सदस्य डॉ. सिध्दार्थ दुभाषी यांनी स्टुडन्ट सपोर्ट अॅण्ड प्रोग्रेशन, गव्हनर्स लिडरशिप अॅण्ड मॅनेजमेंट विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरीता विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यामध्ये त्याचा शिक्षणासह समाजोपयोगी व सांस्कृतिक कामात ओढ निर्माण होईल. महाविद्यालयस्तरावर राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. आदी उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाची घडण करणे शक्य आहे. महाविद्यालयात मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी फॅकल्टी प्रोग्राम, चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन आवश्यक आहे. महाविद्यालयात ई-ग्रंथालयाचा वापर, अद्ययावत माहितीकरीता इंटरनेट व सॉफ्टवेअरचा वापर होणे गरजेचे असल्याचे   त्यांनी सांगितले.

तुतीकोरीनचे येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजा डी. पेचुमिथू यांनी इन्स्टिटयुशनल व्हॅल्यू अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीस विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांचा सहभाग असणे गरजचे आहे. यासाठी बायोगॅस, सौरउर्जा, पवनउर्जा आदी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते वापरण्यायोग्य करावे जेणेकरुन पाण्याचा अपव्यय होणार नाही. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण गरजेचे आहे. आजच्या तंत्राज्ञानाच्या काळात सर्वांनी पर्यावरणस्नेही रहावे. आपली संस्कृती आणि आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.

‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष’ उपक्रमातंर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यशाळेचे समन्वयन वैद्यकीय विद्याशाखेच अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे यांनी केले. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. डॉ. प्रत्युष काबरा यांनी परिचय करून दिला. या कार्यशाळेचे आयोजन उपकुलसचिव डॉ. नितीन कावेडे यांनी केले. श्री. सचिन धेंडे, श्री. दिप्तेश केदारे यांनी तांत्रिक सहाय्य केले. वैद्यकीय शाखेकरीता आयोजित कार्यशाळेस विद्यापीठाचे विविध संलग्तिन महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य, अभ्यांगत व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...