Skip to main content

पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस राबवणार परिवार संवाद अभियान: दिलीप खैरे

नाशिक| आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचवटी विभागाची बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 
NCP-to-launch-family-dialogue-campaign-in-Panchavati-division-Dilip-Khaire

नाशिक महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार विभागवार अध्यक्षांच्या नेमणूका देखील करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार आज प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटी विभागाची बैठक पार पडली.


यावेळी मोतीराम पिंगळे, सुरेश आव्हाड, सुरेखा निमसे, संतोष जगताप, निलेश जगताप, सरिता पगारे, चिन्मय गाढे, सागर लहामखेडे, किरण पानकर, गणेश पेलमहाले,महेश शेळके, विजय पेलमहाले, रामेश्वर साबळे,आर्यन मोकळ, वैभव अभंग, गणेश सदाफुले, बजरंग गोडसे, सागर अभंग, निलेश जगताप, साहिल मोकळ, सचिन काळसरे, हिमांशू चव्हाण, विलास वाघ, रुपाली खैरे, प्रफुल्ल पाटील, वनिता आहेर, मीनाक्षी काकळीज, स्वप्नील निकम, अरविंद सोनवणे, विशाल वाघ, विकास इंगळे, आकाश कोकाटे, संध्या निकाळे, संगीता घाडगे यांच्यासह सर्व सेलचे विभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे म्हणाले की, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक लढविण्यात येणार असून या निवडणुकीत जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षातील ज्येष्ठ नेते, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बाळासाहेब कर्डक म्हणाले की, राष्ट्रवादी संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, समाजसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब व पक्षाचे विचार, ध्येय धोरणे याबाबत संवाद घडवून आणण्यात येईल. तसेच नाशिक महानगरातील समस्या जाणून घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळं, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आपले मते मांडली.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...