Skip to main content

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह ९ मागण्या मान्य; ग्रामसभेनंतर आंदोलन मागे

पुणतांबा| दि. ७ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  दालनात बैठक होऊन साधक बाधक चर्चा झाली. त्यात १६ ठरावापैकी ९ ठरावावर सकारात्मक विचार झाला, ७० टक्के मागण्यांवर समाधान झाल्याचे ग्रामसभेत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले. त्यामुळे पुणतांबा ग्रामसभेत तूर्तास आंदोलन थांबवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

पुणतांबा येथे १ जूनपासून सुरू केलेले शेतकरी आंदोलन तूर्तास तरी थांबविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. २३ मे रोजी पुणतांबा येथे विशेष शेतकरी ग्रामसभा आयोजित करून शेतकऱ्याच्या शेतमाल,विज,कर्ज व इतर अडचणीचे ठराव करून सरकारला निर्णय घेण्यासाठी १ जूनपर्यंतचे अल्टिमेट देण्यात आले होते, पण याची दखल सरकार दरबारी घेण्यात न आल्याने किसान क्रांतीतर्फे आंदोलन सुरू झाले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महसूल मंत्री,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी आंदोलक यांच्याशी चर्चा करत पाच दिवसानंतर संगमनेरला बैठकीला या म्हणून सांगितले त्यानंतर चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी तीन तास चर्चा करून ७ जूनला उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक पक्की केली.उपमुख्यमंत्री यांच्या दालनात साधक बाधक चर्चा होऊन १६ ठरावापैकी ९ ठरावावर सकारात्मक विचार झाल्याने ७० टक्के मागण्यांवर समाधान झाल्याचे ग्रामसभेत सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांनी सांगितले.

तर थकित विज बिलाचे व्याज दंड माफ होणार. कृषीपंपाचा पन्नास टक्के विज बिल माफ करणार. राज्यसरकारकडून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. कृषीसाठी दिवसा विज देण्यासाठी प्रयत्न करणार. पूर्ण विजबिल भरणारास सोलर पंप दिले जाणार.सोलर पंपासाठी ६०% अनुदान दिले जाणार. १५ जुनपर्यंत ऊसाचे गाळप, गाळपाविना ऊस शिल्लक राहीला तर अनुदान दिले जाणार. १५ जुननंतर आढावा घेऊन सरकार ऊसाला अनुदान देणार. गाळपासाठी गेलेल्या ऊसाला प्रतीटन एक हजार देण्यास सरकारचा नकार.

कांद्याला अनुदान देण्यास सरकारचा नकार, कांद्याच्या हमीभावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार,आयात निर्यात धोरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, दुधाच्या एआरपीसाठी कमेटी गठीत होणार, भारतभर दुधाचा एकच दर राहावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार,दुध दराच्या तफावतीमुळे दुधाला हमीभाव देणं अशक्य,फळे आणी भाजीपाल्याचे दर निश्चित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा,नियमित कर्ज भरणारांना 50 हजार रूपये अनुदान दिले जाणार,एक जुलैपासून अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यावर जमा होणार,राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी मिळणार, दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणारांनाही मिळणार लवकरच  कर्जमाफी,दोन लाखाच्या पुढची बाकी शेतकऱ्यांना भरावी लागणार,राज्यसरकार घेणार लवकरच निर्णय, कांदा गव्हासह इतर आयात निर्यात धोरणासाठी राज्यसरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार, मागेल त्या शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार, सॅटेलाईट व्दारे पिकपाहणीसाठी यंत्रणा उभारणार, खतांच्या अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा,पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विहीर देणार,शेतकरी कुटुंबासाठी दोन लाख रूपयांचा विमा, २०१७ साली झालेल्या शेतकरी संप आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार,सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा जिवीतहानी नसेल तर गुन्हे मागे घेतले जाणार,कृषी मुल्य आयोगाला महिनाभरात अध्यक्ष नेमणार अशी आश्वासने मिळाली असल्याची माहिती विठ्लराव जाधव यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली. 

शेवटी सुहास वहाडणे यांनी आंदोलन थांबविण्यात येत असल्याचा ठराव मांडला या ठरावाला बाळासाहेब चव्हाण यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.अश्या प्रकारे ग्रामसभेतून सुरू झालेले आंदोलन ग्रामसभा घेऊन तूर्तास तीन महिन्यांसाठी थांबविण्यात आले आहे.या ग्रामसभेला राहाता तालुका नायब तहसीलदार, पुणतांबा तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल,यांच्या सह किसान क्रांती कोअर कमिटी,सदस्य बरोबर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...