Skip to main content

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानस’ ॲप उपयुक्त: कुलगुरू माधुरी कानिटकर

नाशिक| विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ’मानस’ अॅप उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी केले. आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु का कट्टा’ ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प.वि.से.प यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Manas-app-useful-for-mental-health-of-students-Vice-Chancellor-Madhuri-Kanitkar-app-useful-for-mental-health-of-students-Vice-Chancellor-Madhuri-Kanitkar
या कार्यक्रमास मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ. धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. 

विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, MANAS म्हणजे मेंटल हेल्थ आणि नॉर्मलसी ऑगमेंटेशन सिस्टम या प्रणालीचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी ‘मानस’ चे कार्य प्रभावी आहे. विद्यार्थ्यांनी निरोगी, आनंदी आणि स्वस्थ राहण्यासाठी मानसची भूमिका महत्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्याची समस्या लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. 
      
त्या पुढे म्हणाल्या की, अभ्यास करतांना विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येतात. संशोधन, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महत्वाकांक्षी असावे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘कुलगुरु का कट्टा’ च्या माध्यमातून प्राप्त माहितीव्दारे अनेक बाबी पुढे येतात त्यानुसार विद्यापीठाकडून निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाचे विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरण संवर्धन, उर्जा बचतीचे अनेक उपक्रम सर्वांसाठी हितकारक आहेत. विद्यार्थ्यांनी आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधन, कौशल्य विकास, वाचन आदी गुणांचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील रहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून निर्देशित केलेल्या उपक्रमात मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठाकडून उपक्रम राबविण्यात येतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपक्रमांची माहिती प्रसिध्द करण्यात येते. शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांनी नेहमीच अद्यायावत ठेवावे असे त्यांनी सांगीतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे विद्यापीठाचे युटयुब चॅनलवरुन प्रसारण करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालय प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...