Skip to main content

नवउद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा: पल्लवी मोरे

नाशिकरोड|प्रतिनिधी|नवउद्योजकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विभागीय संयोजक पल्लवी मोरे यांनी केले.

New-entrepreneurs-should-take-advantage-of-the-schemes-Pallavi-More

जिल्हा मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या कार्यकारिणीची सभा गंगापूररोड येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, संस्थेचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. माधव मुधाळे, सरचिटणीस उल्हास बोरसे, सहसचिव मनोज आमले, कार्याध्यक्ष उमेश शिंदे, खजिनदार सुनील घुले, अमित पवारकुणाल देसले यांची प्रमुख उपस्थिती होती.


विशाल देसले म्हणाले की, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कोणतीही लाज न बाळगता बूट पॉलिश पासून ते डोक्याच्या तेल मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय स्वीकारण्यात युवकांनी लाज बाळगू नये या हेतूने मराठा उद्योजक कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या माध्यमातून नवोद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध केल्या जातात. दीपक भदाणे यांनी सेवा संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. उद्योजक कक्षाचे जिल्हा सरचिटणीस उल्हास बोरसे म्हणाले की, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नवोद्योजकांसाठी मैलाचा दगड ठरेल.


उद्योग व्यवसाय उभारणीसाठी अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. जिल्हा मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे शहराध्यक्ष अमोल पाटील, इगतपुरी अध्यक्ष अमोल खातळेचांदवडचे नितीन गांगुर्डे, उद्योजक क्रांती बेडसे, अवधूत सस्कर, संदीप सोमवंशी, अरविंद देशमुख, सुनील कोईनकर, धनंजय शिंदे, सुशांत जाधव, मंगेश टरलेअभिषेक पवार, नितीन पाटील, मनीष अहिरे-पाटीलमयूर मगरराजीव पगार आदी उपस्थित होते. नवउद्योजकांनी ८००७७७४७२२ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन विशाल देसले यांनी केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...