Skip to main content

सुका मेवा खरेदीकडे ग्राहकांचा वाढतोय कल; डिंकाचे लाडू बनविण्यात महिलावर्ग व्यस्त

नाशिकरोड|प्रतिनिधी|थंडीची चाहूल जाणवल्यास ग्राहकांची पावले सुका मेवा खरेदी कडे वळतात. नाशिक मध्ये गारठा वाढल्याने सुका मेवा टाकून हिवाळ्यातील खास पदार्थ व सर्वांचे आवडते असे "डिंकाचे लाडू" तयार करण्यात घरोघरी महिलावर्ग प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड, उपनगर, गांधीनगर बाजारात किराणा दुकानांमध्ये सुका मेवा खरेदी साठी ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी होत आहे. तरुणवर्ग शरीर कमावण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक तंदुरुस्तीसाठी तसेच लहान मुलांना पौष्टिक आहार हिवाळ्यात प्राप्त व्हावा, यासाठी सर्वच वयोगटातील लोकांची मागणी सुका मेव्याला असते. बदाम, काजू, खारीक, सुरी खारीक, खोबरे, डिंक, गूळ, साखर, अंजीर, जरदाळू, अक्रोड, तूप, बिब आणि चाराची गोडांबी व ईतर पौष्टिक सुका मेव्याची मागणी वाढल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात. 

यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने थंडी  जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञांतर्फे बांधण्यात आला होता. तो खरा ठरून साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पासून नाशिक मध्ये गारठा वाढायला सुरुवात झाली. पहाटे आणि सायंकाळी सहा नंतर थंडीचा कडाका जाणवतो. बहुतेक जण यादिवसात सकस आहाराला प्राध्यान्य देतात. सर्वच वयोगटातील नागरिकांना सकस आहाराचा सल्ला डॉक्टरही देतात. घरातील ज्येष्ठ मंडळी, लहान मुलांच्या आरोग्याप्रती काळजी घेऊन घरातील महिलावर्ग डिंक लाडू तयार करण्यास आग्रही आहेत. सुका मेव्याच्या दर्जा प्रमाणे वेगवेगळे दर आहेत.

खारीक २०० ते ३५० रु, सुरी खारीक ४५० ते ५००, काजू ७५० ते ९००, बदाम ७०० रु पुढे, डिंक १६० ते २००, गूळ ६० रु, साखर ३८ रु, खोबरे ६० रु पुढे, प्रती किलो असे सर्वसाधारण दर दिसून येतात. सुका मेवा व ईतर हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी अजून वाढेल, असा अंदाज स्थानिक दुकानदार व्यक्त करतात.

हिवाळ्यात सुकामेव्याला वाढती मागणी

हिवाळ्यात सुका मेवा व ईतर पौष्टिक पदार्थांना मागणी वाढते, हे लक्षात घेऊन तसे नियोजन करण्यात आले होते. सुका मेव्याचे भाव तसे स्थिर राहतील, पण खारीक, सुरी खारीक यांचे भाव पुढे वाढण्याचा अंदाज आहे.

बाळासाहेब दंदणे, 
भारत प्रोव्हिजन, गांधीनगर.

---------------------------

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...