Skip to main content

कमिशन वाढवून देण्यावर अन्न प्रशासन सकारात्मक: महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशन

नाशिक|प्रतिनिधी| मुंबई येथे ऑल महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशन पुणे यांची अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या समवेत बैठक झाली. धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नाकडे फेडरेशनचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांनी लक्ष वेधले. त्यात दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे निवृत्ती कापसे यांनी कळविले आहे. यावेळी राज्यातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. 
Food-Administration-positive-on-increasing-commission-Information-from-Shop-Keepers-Federation
तसेच विविध मागण्या पुढीलप्रमाणे: अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्व दुकानदारांना माल लवकर मिळावा व मशीनमध्ये लवकर टाकण्यात यावा, दर महिन्याला मशीन डाटा लवकर टाकण्यात यावा, नेटवर्क उपलब्ध करून दयावे, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, धान्य वजन करून मिळावे, 'पीएमजेके'चे प्राधान्य कमिशन त्वरीत मिळावे, कमिशन मंत्रालयातूनच टाकण्यात यावे, तसेच सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहे. प्रत्येक कार्ड धारकाचा थम असल्यामुळे सर्व ऑनलाईन दिसत असल्यामुळे आता ग्राम दक्षता समितीच्या इतिवृत्ताची  आवश्यकता नाही हडोळसे पाटील यांनी अन्न सचिव यांच्या निदर्शनास आणून दिले. 

त्यामुळे दुकानदाराची अडवणुक होत असून या सर्व गोष्टी प्रधान सचिव यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सर्व गोष्टी प्रधान सचिव यांनी समजून घेतल्या, तसेच सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी नेत्रा मानकामे, कोळेकर साहेब, पूजा मानकर मॅडम ,गजानन देशमुख साहेब, अस्मिता पाटील, वित्त सचिव घाडगे साहेब, राज्यध्यक्ष गणपत डोळसे पाटील, बाबुराव ममाने, शंकर सुरवसे, दिलीप नवले, निवृत्ती कापसे, संजय देशमुख शहाजी लोखंडे, विवेक भैरे, हरिष गुप्ता व राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...