Skip to main content

१७ ते २४ मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नाशिक| प्रतिनिधी| श्रीक्षेत्र रेडेश्वर महाराज समाधी मंदिर आळे ता. जुन्नर जिल्हा, पुणे येथे संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. १७ ते २४ मे २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.
Organized-Akhand-Harinam-Week-from-17to-24th-May

ज्या महाराष्ट्रभूमीत ज्या रेडेश्वराला माऊली संत ज्ञानेश्वर महाराज याचा संघ झाला व पशु वेद बोलला त्या रेडेश्वराला संतत्व प्राप्त झाले. अश्या संतरेडेश्वर महाराजांच्या भूमीत जेथे माऊलीने त्यांना समाधी दिली, तेथे काकडा आरती .भजन तसेच. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ) यांचे रोज सायंकाळी . ४ .ते. ६ श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र होईल, तसेच रोज ६ .ते ८ . कीर्तने अनुक्रमे रोज . 
१) ह.भ. भ .जयेश महाराज भाग्यवंत भिवंडी.
२ ) ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे .( निफाड ) 
३ ) ह . भ .प. केशव महाराज नामदास .( पंढरपूर ) 
४ ) ह . भ .प. एकनाथ महाराज सदगीर . ठाणे 
५ ) ह .भ.प. दिनकर महाराज अंचवले .( शेवगाव . धाकटी पंढरी आत्मा.
६ ) ह . भ .प. पोपट महाराज पाटील ( कासारखेडे .
७ ) ह .भ .प. ज्ञानेश्वर मावली कदम ( छोटे माऊली .आळंदी  ) यांचे जागराचे व काल्याचे किर्तन होईल  . 

तसेच महाप्रसाद व चहा, नाष्टा जेवनाची व्यवस्था, राहाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोणतेही व्यसन असलेल्या व्यक्तीने येऊ नये, नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरातून या कार्यक्रमाला मानाच्या दिंडयाचे वारकरी, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र पंढरीचे व श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे वारकरी उपस्थित राहणार आहेत. आळंदी, सासवड .श्रीमाननिवृत्तीनाथ महाराज तथा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी मंडळ उपस्थित राहणार आहे . भाविकांनी या कार्यक्रमाचा व श्रवण सुखाचा लाभ घ्यावा हरिभक्त परायण वारकरी भूषण ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होऊन महाप्रसाद होईल.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...