Skip to main content

भाषा हेच संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम: कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक|प्रतिनिधी|भाषा हे खरं तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे त्याचा उपयोग बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता वाढविण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कानिटकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
Language-is-the-medium-of-communication-and-education-Vice-Chancellor-Madhuri-Kanitkar
याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करण्याची माझी मोठी इच्छा आहे आणि सुदैवाने मी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत राहत आहे याचा मला अभिमान वाटतो. आपण मराठी साहित्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. विज्ञान कितीही पुढे गेले तरी समाजाला एकत्र ठेवणारी संस्कृतीच असते असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्रत्येक प्रांतानुसार मराठी भाषेचा लय बदलतो मात्र भाषेचा गोडवा कायम राहतो. मराठी ही सर्व भाषा सर्व बाजूंनी समृध्द आहे तिचा वापर मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे. संगणक आणि मोबाईलचा अतिवापरामुळे भाषेवर परिणाम होत आहे यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. यासाठी भाषेचे संवर्धन करूया. भाषेची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी स्पर्धा व कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
         
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, मराठी भाषेला आपण प्राधान्य दिले पाहिजे. मराठी भाषेचा प्रसशासकीय कामात वापर वाढणे आवश्यक आहे. भाषेची समृध्दता जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मानवी संवेदना काव्यातून, ग्रंथांतून, आणि भाषणातून व्यक्त करण्यासाठी भाषा हे महत्वाचे माध्यम आहे. बालवयात मुलांना भाषेची जाण करुन देणे गरजेचे आहे. यासाठी मराठी पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते असे त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात श्री. उल्हास कुलकर्णी, श्रीमती सविता पाटील, श्री. अजित डेरे यंानी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील काव्यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...