Skip to main content

नाशिकरोड ते व्दारका रस्त्यावरील वृक्ष हटवण्यास सुरुवात; मात्र अतिक्रमण होणार नाही, दक्षता घ्या..!

नाशिकरोड|प्रतिनिधीना|नाशिकरोड ते व्दारका रस्त्यावरील प्राचीन वृक्ष हटविण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तमंदिर, उपनगर नाका, गांधीनगर येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी २४ झाडे तोडण्यास महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहतूक वेगाने व सुरक्षित होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. वाहतूक कोंडी व अपघात टळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नंतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तोडण्यात येणा-या जुन्या वृक्षांच्या बदल्यात देशी झाडे लाऊन ती वाढवावीत, अशी मागणी होत आहे.

Removal-of-trees-from-Nashik-Road-to-darka-road-started-Will-it-widen

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले की, व्दारका ते नाशिकरोड या साडेसहा किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण नव्हे तर मजबूतीकरण होणार आहे. अकरा महिन्यांची मुदत या कामासाठी असली तरी १५ मे पर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण खर्च १९.४२ कोटी खर्च येणार आहे. यामध्ये रस्ता मजबूतीकरण, डांबरीकरण, गतीरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजकांना रंगरंगोटी व ग्रील दुरुस्ती, धोकादायक झाडांना रेडियम लावणे आदींचा समावेश आहे.


या मार्गावरील २४ झांडापैकी १५ तोडली जाणार असून नऊ झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. अतिक्रमणे ओळखण्यासाठी रस्ता कडेला पांढरे पट्टे मारण्यात येणार आहे. देवळालीगाव, जयभवानी रोड, उपनगर, गांधीनगर, विजय ममता चौक, जेलरोड-टाकळी, टाकळी-काठेगल्ली मार्गे नाशिकला जाता येते. हे सर्व उपरस्ते नाशिकरोडला कोठे ना कोठे मिळतात. नाशिकरोड व उपनगरातील हजारो नागरीक, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक या मार्गाने नाशिकला ये जा करतात. सकाळी व सायंकाळी हा महामार्ग जॅम होतो. त्यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर करणे काळाची गरज झाली आहे.


नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जुनी झाडे रस्ता रुंदीकरणासाठी तोडल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आता तेथे वाहने व व्यावसायिकांची अतिक्रमणे झाली आहेत. व्दारका ते नाशिकरोड दरम्यान झाडे तोडून रूंद केला तरी ठिकठिकाणची अतिक्रमणे हटविण्याची हमी पोलिस, महापालिका, महामार्ग प्राधिकरणाने द्यावी, एकमेकांकडे बोट न दाखवता कारवाई करावी. व्दारका चौकात रिक्षा, टेम्पो, एसटी व खासगी बस उभ्या राहतात. पुढे दुतर्फा व्यावसायिकांचे ठेले आहेत. काठे गल्ली सिग्नल परिसरातही हीच समस्या आहे. विजय ममता सिग्नलच्या पुढे दुतर्फा वाहने उभी केली जातात. उपनगर नाका सिग्नल येथेही अतिक्रमणे रस्त्यावर खड्डे आहेत. तेथून पुढे दत्त मंदिर चौक, बिटको चौकापर्यंत दुतर्फा दुचाकी, छोटी मोठी वाहने, व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. 


सिन्नर फाटा-पुणे रस्ता रुंदीकरणाची कार्यवाही पूर्ण झाल्याने वाहतूक वेगवान व  सुरक्षित झाली आहे. वेळ व इंधनाची बचत होत आहे. अपघात मालिकांवर नियंत्रण आले आहे. मात्र, नाशिक रोड ते व्दारका दरम्यान काही झाडे, अतिक्रमणे यांचा अडथळा असल्याने वाहतूक कोंडी, प्रदूषणात वाढ होते. इंधन व वेळेचा मोठा अपव्यय होतो. नाशिकरोड-व्दारका दरम्यान अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. रस्ता मजबूतीकरणाची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता पाऊले टाकली आहेच. शंभर वर्षे जुनी कडुनिंब, वड, चिंच अशी झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे.


 


नाशिकरोड-व्दारका मार्गावरील झाडे तोडून प्रशासनाने रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मोठा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडी, प्रदूषण टळणार आहे. हे काम झाल्यावर अतिक्रमणे होणार नाही याची दक्षता घ्यावी.


डॉ. विजय गायकवाड


 


रस्ता दुतर्फा दर दहा मीटरवर झाडे लावण्याचा कायदा आहे. तोडल्या जाणा-या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे, प्रत्येक रस्त्यावर जास्तीत जास्त झाडे लावणे सक्तीचे आहे. त्याचे पालन करावे. रस्त्याकडेची झाडे तोडू नयेत.


अश्विनी भट, पर्यावरण कार्यकर्ते

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...