Skip to main content

युवकांनी नोकरी सोबतच व्यवसायातही उतरावे: ना. चंद्रकांत पाटील

नाशिकरोड|प्रतिनिधी| देशातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, असा प्रयत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा होता. त्यासाठी युवकांनी नोकरीच्या बरोबरीने व्यवसायात उतरले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. युवकांचा कौशल्य विकास, त्यांच्या संस्थेसाठी कर्ज आणि संस्थेत निर्माण होणा-या वस्तूला बाजारपेठ असा वाजपेयींचा दृष्टीकोन होता. त्यातूनच १९९८ साली राष्ट्रीय स्तरावर एनवायसीएस संस्था सुरु झाली. या संस्थेला सर्व ती मदत करू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
Youth-should-enter-business-along-with-job-minister-Chandrakant-Patil
नवी दिल्लीतील नॅशनल युवा को-ऑपरेटीव्ह सोसायटीची (एनवायसीएस) देशातील ३४ वी शाखा जेलरोड येथे सुरु झाली. तिचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव,  आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे,  माजी आमदार बाळासाहेब सानप,  नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्ही. एन. नाईकचे सरचिटणीस हेमंत धात्रक,  उध्दव निमसे, विजय साने, महेश दाबक, सुनिल आडके, शांताराम घंटे, महाव्यस्थापक  आर. डी. कुलकर्णी, प्रतिम आढाव, गिरीष पालवे, सुनिल बच्छाव  हे व्यासपीठावर होते.

आमदार राहुल ढिकले म्हणाले की, चांगले काम करायचे असेल तर सर्वजण पाठिंबा देतात, हे नाशिक रोडचे वैशिष्ट्य आहे. संस्था वाचली तर सहकार चळवळ वाचेल. सहकारी संस्था कोणती, त्यापेक्षा ती कोण चालवते यावर विश्वासर्हता अवलंबून असते. सहकाराला घर घर लागून स्वाहाकार वाढला आहे. त्यामुळे २५ टक्के सहकारी बॅँका बंद पडल्या आहेत. मात्र, नरेंद्र मोदींनी अमित शहांना सहकार मंत्री केल्यानंतर देशातील चित्र बदलत आहे. महाराष्ट्रातील सहकाराचे चित्र सुधारायचे असेल तर शहांसारखा हेड मास्तर गरजेचा आहे.

राजेश पांडे म्हणाले की, संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संस्थेच्या ६२० जिल्ह्यात शाखा आहेत. ३३ राज्यात काम चालते. ३० हजार सभासद आहेत. देशभरातील सर्व युवकांना सभासद करण्याचा प्रयत्न आहे. ही पतसंस्था नसून मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्था आहे.

शाखा अध्यक्ष संजय किर्तने यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी सूत्रसंचालन केले. सचिव ज्ञानेश्वर भोर यांनी आभार मानले.

संचालक प्रमोद मुर्केवार, संचालिका प्रतिभा सोनवणे, रविद्र शिंदे, निलेश अहिरराव आदींनी संयोजन केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...