Skip to main content

त्र्यंबकेश्वरला ५ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|  नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दि. ५ जानेवारीपर्यंत राजशिष्टाचारा व्यतिरिक्त अन्य व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कर्डक यांनी दिली आहे.

ट्रस्टचे चेअरमन यांनी दिलेल्या निवेदनाची माहिती कर्डक यांनी दिली.  त्र्यंबकेश्वर हे अत्यंत महत्वाचे ज्योर्तिलिंग असल्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. निरनिराळ्या माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे, प्रशासनावर मोठा ताण असतो. तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न याचा विचार करता नाताळ व  नवर्षाच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय- राज्य स्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज् शिष्टाचार संबंधी लेखी पत्रव्यवहारा व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिआयपी दर्शन दिनांक २२ डिसेंबरपासून दि. ५ जानेवारी २०२५ पर्यंत बंद राहणार आहे. 

त्याचप्रमाणे नियमित मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षा घेता, नाताळच्या सुट्टया तसेच इतर वेळी दर्शनासाठी येणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या संख्येमधील देखील कायमस्वरूपी विभागवार मर्यादा निश्चित करण्यात आली असून त्यानुसार दैनंदिनरित्या फक्त सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते ७ या निश्चित वेळेत २० अति महत्वाच्या व्यक्तींची दर्शनाची व्यवस्था श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येईल, तरी मंदिर प्रशासनावर गर्दीमुळे होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी विचारात घेता आपण श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन कर्डक यांनी केले आहे.








Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...