Skip to main content

केंद्र- राज्य शासनाकडून प्रलंबित प्रश्न मार्गी लावू: आयुक्त मनिषा खत्री

नाशिक| केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत देखील पाठपुरावा करुन ते प्रश्न मार्गी लावणेकामी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मनिषा खत्री यांनी आज सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्याप्रसंगी त्याबोलत होत्या.

नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुरु असलेले विविध प्रकल्प सकारात्मक दृष्टया सुरु ठेवणार असल्याचे बैठकीत सांगितले. त्याचबरोबर सर्व विभागांची प्राथमिक माहिती घेवून त्यांनी सर्व विभागांना त्यांच्या कामकाजाबाबत सादरीकरण करण्याचे आदेश दिले.  खातेप्रमुखांनी सर्व कामकाजात पारदर्शकता ठेवावी  व प्रत्यक्ष कामात असलेल्या अडचणींबाबत आपल्याशी थेट संपर्क साधावा असे त्यांनी बैठकीत सांगितले.  शहर स्वच्छतेला आपले प्राधान्य रहाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आगामी कुंभमेळयांच्या नियोजनाच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पूर्वीच्या अनुभवानुसार शहर विकासाच्या दृष्टीने नवनविन संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. तसेच आपल्या माध्यमातून नागरीकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुवीधा तत्पर व विनातक्रार देण्यावर आपले प्राधान्य रहाणार असून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व सुसूत्रता आणणार असल्याचे बैठकीत सांगितले,नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आणि त्यांवर नागरिकांच्या प्रतिक्रिया व अभिप्राय याचा अभ्यास करून  त्यानुसार कामकाज करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा असेही त्यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत नमूद केले. बैठकी नंतर मनपा मुख्यालय,राजीव गांधी भवन येथील विविध विभागांना भेटी देऊन पहाणी केली.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...